दैनिक मुख्य पान  |  मराठी मुख्य पान

सनातनवर बंदी आणू पहाणारे सनातनच्या साधकांची आध्यात्मिक प्रगती रोखू शकणार नाहीत !

काही तरी करून सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती व सनातन प्रभात यांच्यावर कारवाई करण्यासाठी राज्यकर्ते व पोलीस यांचा सुरू असलेला खटाटोप ! ४ जून २००८ रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये काही हिंदूंनी बाँबस्फोट केला. या बाँबस्फोटप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी सनातनच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली. संबंधित आरोपींनी `या कृत्याशी सनातनचा व हिंदु जनजागृती समितीचा संबंध नसून आम्ही हे कृत्य `आम्ही पाचपुते' या नाटकात केलेल्या हिंदु देवतांच्या विडंबनाच्या विरुद्ध वैयक्‍तिक रागातून केले आहे', असे पोलिसांना सांगितले. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती व `सनातन प्रभात'चे संपादक यांनी पोलीस तपासामध्ये पूर्ण सहकार्य केले. असे असले तरीही राज्यकर्ते व धर्मद्रोही यांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी कुठूनतरी या संघटनांचा व `सनातन प्रभात'चा बाँबस्फोटाशी संबंध जोडण्यासाठी गेले तब्बल चार महिने त्यांचा पिच्छा पुरवला, तसेच पोलिसांनी त्यांच्या तपासाचे सत्र अद्यापही सुरूच ठेवले आहे.


पीतपत्रकारिता करून सनातनला दहशतवादी ठरवणारी वृत्तपत्रे !

ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे झालेल्या बाँबस्फोट प्रकरणात सनातन आश्रमातील काही कार्यकर्ते आरोपी आहेत. या प्रकरणाचा तपास करणार्‍या हशतवादविरोधी पथकाला सनातनने पूर्ण सहकार्य केले व आजही करत आहे.


मतांच्या राजकारणासाठी `सनातन'ला राजकीय बळी देण्याचे षडयंत्र !

`सनातन'वर बंदीची मागणी

मुंबई, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या बाँबस्फोटाचे निमित्त करून `सनातन'वर बंदी आणण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार व महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी केली आहे. निवडणुका जवळ आल्याने राजकीय सोय पाहून मतांच्या राजकारणासाठी `सनातन'सारख्या हिंदूंच्या आध्यात्मिक व राष्ट्रप्रेमी संघटनेचा राजकीय बळी देण्याचे हे षडयंत्र रचले जात आहे. या स्फोट प्रकरणी अटक केलेल्या आरोपींनी सदर कृत्याशी सनातन संस्थेचा काहीएक संबंध नसल्याचे सांगितल्याचे, पोलिसांनीच पत्रकार परिषदेत म्हटले होते. देशभरात ठिकठिकाणी झालेल्या बाँबस्फोटप्रकरणी आपल्या राज्याचे गौरवशाली पोलीसदल राष्ट्रघातकी मुसलमान अतिरेक्यांना मोठ्या प्रमाणात पकडत आहे; मात्र यामुळे मुस्लिम समाजात वाढत असलेली नाराजी लक्षात घेऊन, ती दूर करण्यासाठी आम्ही हिंदूंच्या `सनातन' संस्थेवरही बंदी घालत आहोत, असा संदेश दिला जात आहे ! गडकरी रंगायतन बाँबस्फोटप्रकरणी `सनातन'ने मुंबईत जाहीर पत्रकार परिषद घेऊन या कृत्याचा निषेध केला आहे. तसेच पोलिसांनाही चौकशीत सर्वतोपरी सहकार्य केले आहे. सनातन संस्था गेली १८ वर्षे समाज, राष्ट्र व धर्म यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. सनातनने धर्मरक्षणासाठी कायमच सनदशीर मार्गाने आंदोलने केली आहेत. तसेच लहान मुलांसाठी बालसंस्कार वर्ग, प्रथमोपचार, अमली पदार्थविरोधी मोहीम, आदिवासींना कपडे वाटप, मोफत नेत्रचिकित्सा व चष्मेवाटप शिबिरे, रक्‍तदान शिबिरे, पोलीस व सैन्यातील जवानांसाठी ताणतणाव नियंत्रण वर्ग, जत्रा सुनियोजन मोहीम, राष्ट्रध्वजाचा सन्मान मोहीम, धार्मिक उत्सवांतील गैरप्रकारांच्या विरोधातील मोहीम, वृक्षारोपण आदी अनेक समाजोपयोगी उपक्रम संस्था विनामूल्य राबवत आहे. याउपरही संस्थेला एका भलत्याच कृत्यासाठी जबाबदार ठरवून तिच्यावर बंदी घालण्याची मागणी करतांना या गेल्या १८ वर्षांच्या प्रदीर्घ काळातील समाजसेवेकडे कानाडोळा का केला जात आहे ? इतकेच नव्हे तर, जबाबदार पदावर असणारी आमची नेतेमंडळी सनातन संस्थेसारख्या राष्ट्रभक्‍त व राष्ट्रप्रेमी संघटनेची सिमीसारख्या राष्ट्रद्रोही व अतिरेकी संघटनेबरोबर तुलना करून आपण मतांसाठी कुठल्या थराला जाऊ शकतो, हे सिद्ध करत आहेत. ईश्‍वरी पाठबळ, संतांचे आशीर्वाद व हिंदूंचे प्रेम यांच्या आधारे कार्य करणार्‍या `सनातन'वर बंदी घालण्याच्या राजकीय षडयंत्राला आम्ही भीत नाही. जर येनकेन प्रकारेण बंदी आणण्याचा प्रयत्‍न झालाच, तर त्याला सर्व हिंदूंकडून कडाडून विरोध होईल व येत्या निवडणुकीत त्याचा मोठा राजकीय परिणाम झाल्याशिवाय रहाणार नाही!



धर्माभिमानी हिंदूंना आवाहन : सनातनवरील बंदीच्‍या विरोधात आवाज उठवा!

काँग्रेस सरकार `दैनिक सनातन प्रभात'वर बंदी घालण्यास इतके उतावीळ झाले आहे की, कदाचित हा आमचा शेवटचा संदेश असेल. `दैनिक सनातन प्रभात'चा उद्याचा अंक येईल कि नाही, हे माहीत नाही. सद्यस्थितीत कोणावरही बंदी आणली, तरी ती एका हिंदु संघटनेवर असल्यामुळे त्याचे दु:ख सर्वांनाच असेल; पण त्यातूनही ती बंदी `सनातन प्रभात'वर कोसळली, तर आमचे हजारो हिंदु बांधवांशी होणारे रोजचे संभाषण बंद होईल. `सनातन प्रभात'ने हिंदु बांधवांसाठी केलेल्या कार्यामुळे हजारो हिंदु बांधवांची रोजची व्यष्टीच नव्हे, तर समष्टी साधनेची सुरुवातही `सनातन प्रभात'मधील विचारांनी होते. बंदीनंतर हा विचारांचा ओघ खंडित होईल व हजारो हिंदु बांधवांची स्थिती महापुरात अडकल्याप्रमाणे दिशाहीन होईल. वाचकांनो, आम्ही कधीच अर्थलाभासाठी `दैनिक सनातन प्रभात'चा वापर केला नाही. हिंदूंमध्ये जागृती व्हावी, हिंदु समाज बलसंपन्न व्हावा व ईश्‍वरी राज्याच्या रूपाने लागणारी मधुर फळे हिंदु समाजाला चाखता यावीत, हाच आमचा उद्देश आहे.


खाली दिलेल्या संगणकीय पत्त्यावर तुम्ही निषेधाचे पत्र पाठवू शकता.

मुख्यमंत्री :
मुख्यमंत्री,
मंत्रालय, मुंबई-३२, महाराष्ट्र
दूरध्‍वनी क्रमांक : (022) 2202-5151,5222
chiefminister@maharashtra.gov.in

संपर्क;दैनिक मुख्य पानमराठी मुख्य पान
Copyright © 2007 - दैनिक सनातन प्रभात